जुन्या काळातील एक किस्सा, शेतकरी कथा
🤔🤔 *जुन्या काळातील एक किस्सा* *ज्यावेळी नवीन ट्रॅक्टर फक्त मुंबईतच मिळत असे अन् मुंबईला जाण्यासाठी रेल्वेशिवाय पर्याय नव्हता.अशाकाळात दोन शेतकरी नगदी रक्कम घेऊन ट्रॅक्टर आणण्यासाठी मुंबईला निघाले.* *रेल्वेस्टेशनवर जाऊन तिकीट काढून रेल्वेत बसले आणि रात्री आठच्या सुमारास मुंबईत पोहोचले.स्टेशनवर उतरले, काय करावं समजेना,जवळ नगदी पैसे, कावरे बावरे होऊन इकडे तिकडे बघत होते.दुकाने सकाळी दहा वाजता उघडणार,रात्री पैसे घेऊन कोठे झोपायचे? आता काय करावं हा विचार मनात करत होते.असा विचार करता करता ते बाहेर पडण्यासाठी गेटजवळ आल्यावर त्याने जोडीदाराला सांगितले की तू गप्प बस.कांही बोलू नकोस.आणि गेटजवळच्या टी.सी.जवळ जाऊन घाबरून इकडे तिकडे पाहू लागला.* *टी.सी.ने त्याला विचारले,"ए तिकीट दिखाव!त्याचा तो करारी आवाज ऐकून दोघेही गर्भगळीत झाले आणि म्हणाले नय साब तिकीट पड्या हाय! झूठ बोलता टिकिट नही निकाला,विदाऊट आया और बोलता पड्या है!चल अंदर चल जेलमे बैठ अभी रात के बारा बजे है,सुबह कल केस दर्ज होगा,जोडीदार घाबरला पहिला त्याला म्हणाला उगं गुमान बस काईच...