रब्बीतही एक रुपयातच विमा
रब्बीतही एक रुपयातच विमा गेल्या वर्षी राज्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांनी घेतला होता लाभ, राज्य सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे . या योजनेत अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे , अशी माहिती कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे . राज्यात गेल्या रब्बी हंगामात ७ असा करता येईल लाख ४५ हजार ३१६ शेतकऱ्यांनी ५ विम्यासाठी अर्ज लाख ३४ हजार ९ ४७ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता त्यात २ हजार ३२ कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित केली होती . शेतकऱ्यांच्या हिस्स्यापोटी ३३ कोटी रुपये जमा झाले होते तर केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी सुमारे १२२ कोटी दिले होते . तर एकूण विमा हप्ता २७७ कोटी रुपयांचा होता . त्यापैकी ५० हजार ६७५ शेतकऱ्यांना १८ कोटी ९ ० लाख रुपयांची भरपाई देण्यात आली ■ शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे . ■ रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत , तर गहू ( बागायत ) , हरभरा , रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील . उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्चपर्यंत स...